गर्जनेशिवाय ।
वर्षाकाली धुंद
वर्षे मेघवृंद
। सात्विकसा..!
कर्मेकराणारा सात्विक कर्ता कसा असतो ते
सांगताना दिलेली उपमा-
परि फलशून्यता । नाहीं तया विफळता । पैं
फळासीचि पांडुसुता । फळें कायसी ॥
आणि आदरे करी बहुवसें । परी कर्ता मी हे
नुमसे । वर्षाकाळीचे जैसें । मेघवृंद ॥ ६३३, ३४/१८
नित्यनैमित्तिक कर्मे ही स्वतःच
फलस्वरूप असतात. त्यामुळे ती निष्फळ होण्याचा प्रश्नच नाही. फळांनाच फळं असणं नसणं
हे कसं शक्य होईल? वर्षाकालातील मेघवृंद गर्जना न करता बरसत असतात तसा सात्विक
कर्ता गाजावाजा न करता कर्तव्यबुद्धीने नित्यनैमित्तिक कर्मे करत असतो. मी कर्ता
हेही तो जाणत नाही..!
No comments:
Post a Comment