नभ मेघांतळी ।
पथ पायांतळी
तरू स्थीर
मुळीं । ज्ञानी जसा..!
गुरूकृपेविषयी
विस्तारानं सांगून झाल्यावर ज्ञानी माणसाच्या स्थिरतेविषयी, धैर्याविषयी सांगितले
आहे. ते सांगताना दिलेल्या उपमा-
जातया
अभ्रासवे । जैसे आकाश न धावे । भ्रमणचक्री न भंवे । ध्रुव जैसा ॥ ४८८/१३
पांथिकाचिया
येरझारा । सवें पंथु न वचे धनुर्धरा । कां नाही जेवी तरुवरा । येणे जाणे ॥४८९/१३
तैशा आल्या गेल्या
ऊर्मी । नव्हे गजबज मनोधर्मी । किंबहुना धिरु क्षमी । कल्पांतीही ॥४९८ /१३
ढगांबरोबर
आकाश धावत नाही, ग्रह-तार्यांच्या भ्रमणचक्रात ध्रुवतारा फिरत नाही, पथिक जात येत
असतात पण पायांखालचा रस्ता स्थिर असतो, बाजूचे वृक्ष स्थिर असतात.. तसा ज्ञानी
इंद्रियांच्या ऊर्मींच्या गजबजाटातही स्थिरचित्त असतो.