तरंग होऊन ।
स्वतःशीच खेळे
जळी जळ लोळे ।
स्वानंदात..!
हे असो पवनाचेनि मेळें। जैसे जळींचि जळ
लोळे । ते आणिकें म्हणती वेगळे । कल्लोळ हे ॥१००/५
जसे वार्यामुळं तरंग निर्माण होतात. ते तरंग म्हणजे मुळात पाणीच असतं पण पाहणार्याला पाणी आणि तरंग वेगळे वाटतात.
तसे विश्वाचे मूळ स्वरूप एक आहे. अज्ञानामुळे सर्वत्र वेगळेपण जाणवते हे समजावून सांगताना
ही उपमा दिलेली आहे.