अवस्थात्रयाने
। रूजतो वरती
विस्तारे खालती
। विश्वाकार
विश्व-संसाराला अश्वत्थ
वृक्षाची उपमा देऊन त्याची निर्मिती आणि विस्तार कसा होतो याचे सविस्तर वर्णन केले
आहे...
ते ऊर्ध्व आत्मा निर्मळे । अधोर्ध्व
सूचित मूळें । बळिया बांधोनि आळें । मायायोगाचे ॥
मग आधिली सदेहांतरे । उठती जिये अपारे ।
तें चौपासि घेऊनि आगारे । खोलावती ॥
ऐसे भवद्रुमाचें मूळ । हें ऊर्ध्वीं करी बळ । मग आणियांचें बेंचळ । अधीं दावी
॥ ९१,९२,९३/१५
ब्रह्मतत्त्व आणि माया यांच्या दृढ संबंधांचे आळे तयार होऊन त्यात या वृक्षाची
निर्मिती होते. असंख्य देहरूपी अंकूर फुटून त्याचा अपार विस्तार होतो. अशा या
संसारवृक्षाचे मूळ (माया) ते वरच्या बाजूस म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी रुजले की
फांद्यांचा विस्तार सतत वाढत राहातो...