अनेकधा झाले ।
प्रतिबिंब जळी
वरून न्याहाळी
। कल्लोळांना..!
त्रिगुणांच्या आधीन असलेला देह
त्यांच्या प्रेरणांनुसार वर्तन करत असतो. ज्यावेळी
‘पुरुष’ द्रष्टा होऊन हे पाहतो तेव्हा तो गुणातीत स्व-रूप जाणू शकतो.. हे सांगताना
दिलेली उपमा-
नातरी आपण जळी । बिंबलो तिरोनी न्याहाळी
। चळण होता कल्लोळी । अनेकधा ॥ २८९/१४
तैसे गुणीं गुणापरौतें । जें आपणपें असे
आयितें । तिये अहं बैसे अहंते । मूळकेचिये ॥ २९२/१४
तैं तेथुनि मग पाहता । म्हणे साक्षी मी
अकर्ता । हे गुणचि क्रियाजातां । नियोजना ॥ २९३/१४
काठावरून पाहिले असता आपले प्रतिबिंब
तरंगांमुळे विस्कटून गेलेले दिसते पण काठावरून अलिप्तपणे पाहिले असता बिंब आपल्या
जागी स्थिर आहे हे लक्षात येते तसे त्रिगुणांमुळे स्व-रूप अनेकविध रूपात वर्तताना
दिसत असले तरी ज्ञानी माणसाला सत् रूप स्थिर असते हे कळलेले असते.
No comments:
Post a Comment