ऐल ओलांडुनी ।
क्षितिजी पोचला
ऐल पैल झाला ।
एकाकार..!
एका ईश्वराखेरीज कोणताही विचार नाही अशी
अव्यभिचारी उपासना करणारा भक्त त्रिगुणातीत अशा ब्रम्हत्वाशी पोचतो... हे समजावताना
दिलेल्या उपमा-
जैसा सैंधवाचा रवा । सिंधूमाजीं पडावा ।
विरालेया विरवावा । हेंही ठाके ॥ ३९३/१४
नातरी जाळूनि तृण । वन्हिही विझे आपण ।
तैसे भेदु नाशूनि जाण । ज्ञान नुरे ॥ ३९४/१४
माझे पैलपण जाये । भक्त हे ऐलपण ठाये ।
अनादि ऐक्य जे आहे । तेंचि निवडे ॥ ३९५/१४
मीठ समुद्राच्या पाण्यात पडले तर ते असे
एकरूप होते की मीठ तर वेगळे राहातच नाही पण ते विरघळले हेही उरत नाही. गवत जाळून
मग अग्नीही विझतो तसे वेगळेपण नाहीसे करून ज्ञानही त्या ऐक्यात विलीन होते तेव्हा
भक्त आणि ईश्वर यांच्यातील ऐल-पैलपण विरून सर्व एकाकार होते..!
No comments:
Post a Comment