मेघ उपसती ।
समुद्राचे पाणी
नद्यांची भरणी
। चालू राहे..!
खाली फांद्या आणि वर मुळे अशा विश्वरूपातील
मायावी संसारवृक्षाचे स्वरूप समजावताना दिलेल्या उपमा-
जैसा मेघांचेनि तोंडें । सिंधु एकें
अंगें काढे । आणि नदी येरीकडे । भरितीचि असती ॥ ११९/१५
तेथ वोहटे ना चढे । ऐसा परिपूर्णुचि
आवडे । परी ते फुली जंव नुघडे । मेघांनदींची ॥ १२०/१५
ऐसे या रुखाचें होणेंजाणें । न तर्के
होतेनि वहिलेपणें । म्हणौनि लोकु यातें म्हणे । अव्ययु हा ॥ १२१/१५
एकीकडून मेघ समुद्र उपसत राहतात तर दुसरीकडून
नद्या भर घालत राहतात... त्यामुळे समुद्र कधी आटलाय किंवा ओसंडून वाहतोयसं दिसत
नाही. सदैव पूर्ण भरलेला दिसतो. (पण ही स्थिती मेघ आणि नद्यांचे कार्य सुरळीत असते
तोपर्यंतच...) त्याप्रमाणे पानगळ आणि बहर यांच्या आवर्तनांमुळे संसारवृक्ष अविनाशी आहे
असे वाटते..
No comments:
Post a Comment